पावसाळा


पावसाळा



          येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा..

         कधी जून महिना सुरू होतोय याचीच वाट पाहत असतो आपण कारण उन्हाळा ऋतुत होर पोळून निघाल्यावर सगळ्यांना पावसाची आस लागली असते . आपल्या देश मौसमी हवामानाचा प्रदेश असल्याने देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत च पावसाळा सुरू होतो. जून महिन्यात वातावरणात आश्चर्य जनक बदल होतात. आभाळ ढगांनी दाटून जात , वेगाने वारे वाहतात आणि विजेच्या कडकटासह रिमझिम पावसाळा सुरू होतो. आणि पुढे तीन,चार महिने पडत राहतो.वातावरण प्रसन्न आणि शीतल होते.

       आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. म्हणून पावसाची एक प्रमुख भूमिका आहे. पाऊस पडताच शेतीला सुरुवात होते.अनेक शेतकरी चर खोदून ठेवून त्यात पावसाचे पाणी जमा करतात. तसेच देशात पिण्याचे पाणी सुध्दा पावसा वरच निर्भर असते. पाऊस झाला की नदी,नाले, धरणे वाहून निघतात.कमी पाऊस पडला की पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होतो.

       पावसाळा सुरू झाल्यावर पर्यावरणाचे रुप पालटून जाते. धरती माता जणू हिरवी शालु नेसली आहे असा आभास होतो.  पावसाळा सुरू झाला की अनेक परिवार पर्यटनाला , पावसाची मज्जा घ्यायला सुरुवात होते. पावसाळा उत्साहाचा प्रतीक आहे म्हणून पावसाळयात देशात अनेक सण साजरे होतात. श्रावण महिना, गणपती उत्सव, दहीहंडी , रमझान, नवरात्र खूप  धूम धाम मधे साजरा केले जाते.

          एकी कडे पाऊस जीवाला निसर्गाने दिलेला आशीर्वाद आहे तर  कधी हाच पाऊस एका कोपा सारखं सुद्धा रुप धारण करतो. पावसाळ्यात अनेक रोग पसरतात त्यामुळे अनेक जीव त्रस्त होतात. अतिवृषटीमुळे शेतीची तसेच जीव हानी होते. कमी पाऊस पडला की शेती मरून जाते आणि पिण्याचा पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. पावसाचे अनेक फायदे आहेत तसेच खूप नुकसान सुद्धा आहेत.

      तरीही पावसाळा ऋतु सर्व जीव सृष्टीचा सर्वात प्रिय ऋतु आहे हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.