दिवाळी


दिवाळी


     'दीपावली' हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ "दिव्यांची रांग" असा आहे. भारतीय दिनदर्शिकेनुसार हा उत्सव कार्तिक महिन्याच्या अमावस्या दिवशी साजरा केला जातो. हा सण अज्ञान (अंधार) वर ज्ञानाचा (प्रकाश) विजयाचा प्रतिक म्हणून साजरा केला जातो.

      भारत हा असा देश आहे की, जेथे विविध जाती धर्माचे लोक एक सोबत राहतात आणि सर्व सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे करतात. दिवाळी तर त्याच मोठं प्रतिक आहे. दिवाळी त सर्व आपल्या प्रिय व्यक्तींना भेटतात आणि उपहार आणि शुभेच्छा देतात. दिवाळीच्या सणात आपणाला आपले सर्व दुःख विसरून नवीन जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. या सणाला प्रत्येकाच्या घरी आनंदी आणि उत्साहाचे वातावरण असते.

दिवाळीचे पाच दिवस

दिवाळी हा पाच दिवस चालणारा मोठा उत्सव असतो. दिवाळी सुरू होण्या आधीच घर आणि व्यवसाय ठिकाणी साफ सफाई, नूतनीकरण आणि रंगरंगोटी चे काम सुरू होतात. मुलांना तसेच नातेवाईकांना उपहार देण्यासाठी खरेदी सुरू होते.

दिवाळी च्या पाच दिवसांचे वर्णन


धनत्रयोदशी



         या दिवशी धनाची पुजा केली जाते. सोन्या नाण्यावर गंध,अक्षता, फुल वाहिले जाते.या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने , चांदी खरेदी करतात.धन आणि समृद्धी च्या देवी लक्ष्मी यांच्या आगमनासाठी, घर तसेच व्यवसायाच्या आवारात साफ सफाई करून,सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. कुंकुवाने पायाचे ठसे काढले जातात आणि प्रवेश द्वाराला फुल माळेने साजविले जाते.घरात आणि दुकानात फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवले जाते. आकाश कंदील घरासमोर लावला जातो. पूर्ण रात भर दिवे लावले जातात.

      पुराणात हा दिवस धन्वंतरीचा वाढदिवस मानला जातो- (आयुर्वेदाचा देवता किंवा देवतांचा चिकित्सक) आणि धन्वंतरी जयंती म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी मृत्यूच्या दैवता यमाची उपासना करण्यासाठी रात्रभर दिवे लावले जातात, म्हणूनच याला 'यमदीपदान' म्हणून देखील ओळखले जाते.

नरक चतुर्दशी



    दुसर्‍या दिवशी नरक चतुर्दशी असते. या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी स्नान करण्याची परंपरा आहे. हा दिवस छोटी दिवाळी, काली चतुर्दशी, रुप चतुर्दशी म्हणून देखील ओळखला जातो. प्राचीन ग्रंथात नरकासुर नामक राक्षसाचा,भगवान श्री कृष्ण यांनी आजच्या दिवशी केला होता. हा दिवस विजयाचा प्रतीक आहे.

दिवाळी / लक्ष्मीपूजन



- लक्ष्मीपूजन हा सोहळ्याचा सर्वात महत्वाचा दिवस आहे .या दिवशी लोक मोठ्या उत्साहाने आणि परंपरागत पद्धतीने माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची पूजा करतात.या दिवशी रात्री अंधाऱ्या असूनही हा दिवस खूप शुभ मानला जातो. घर घरात लागणाऱ्या दिवांमुळे हा अंधकार हळू हळू नाहीसा होतो. असा विश्वास आहे की लक्ष्मीजी दीपावलीच्या रात्री पृथ्वीभोवती फिरतात आणि विपुलता आणि भरभराट होण्यासाठी आशीर्वाद देतात. लक्ष्मीपूजन करून झाल्यावर  सर्वांना गोड पदार्थ, मिठाई खाऊ घातले जातात.

हा एक अतिशय शुभ दिवस आहे कारण या दिवशी अनेक संत आणि महान लोकांनी समाधी घेतली आणि त्यांचे नश्वर शरीर सोडले. महान संतांच्या दृष्टांतांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि भगवान महावीर यांचा समावेश आहे. हा दिवस म्हणजेच सीता आणि लक्ष्मण यांच्यासह १४ वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम घरी परतले.

पाडवा / बलिप्रतिपदा


      समारंभाच्या चौथ्या दिवशी प्रतिपदा म्हणून ओळखले जाते . या दिवशी विवाहित दाम्पत्य एकमेकांना शुभेच्छा आणि उपहार देतात . प्राचीन ग्रंथ नुसार, हाच दिवस आहे जेव्हा भगवान श्रीकृष्णाने भगवान इंद्रांच्या मुसळधार पावसाच्या रोषापासून गोकुळमधील लोकांना वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता.

ग्रामीण भागात या दिवशी आपल्या पशूंना म्हणजेच गाई, बैल बकरी यांना मिष्ठान्न खायला देतात.

भाऊबीज

दिवाळी च्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. या दिवस भाऊ - बहिणीच्या अतूट आणि असीम प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा दिवस असतो. अजून वाचा..





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.